अभिनेता सैफ अली खान च्या इतिहासाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद, राम कदम यांनी दर्शवली नाराजी
मुंबई: तान्हाजी चित्रपटात मुघलांचा सेनापती म्हणून काम केलेल्या अभिनेता सैफ अली खान ने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपटात मांडलेल्या इतिहासाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. तो या मुलाखतीत म्हणाला की तान्हाजी चित्रपटात चित्रीकरणा दरम्यान चुकीच्या प्रकारे इतिहास मांडला जात होता याची आपल्याला माहिती होती. पण व्यावसायिक यशासाठी असा चुकीचा संदर्भ दिला जातो. उदयभानची भूमिका खूपच आव्हानात्मक होती म्हणून आपण ती स्वीकारली.”
तसेच ब्रिटिश आल्यानंतर आपण भारत म्हणून एकत्र आल्याचेही यावेळी तो म्हणाला.
सैफ अली खान च्या या वक्तव्यावरून आता एकूणच वातावरण ढवळून निघालं आहे. या मुलाखतीत त्याने जेएनयू, सीएए या मुद्द्यांवरून बॉलिवूड मधील कालाकारांवरही टिप्पणी केली. या वक्तव्यावर भाजपतर्फे आमदार राम कदम यांनी नाराजी दर्शवली आहे.