Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट नाही

पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट नाही

मुंबई, दि. ४: भारतीय हवामान खात्याच्या माहिती नुसार पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही.    पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना सध्या येलो अलर्ट देण्यात आला आहे. वरील सर्व जिल्हे वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये ६५ मिमी पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे.

राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे : 

सुर्या धामणी (ठाणे) (एकूण क्षमता २७६.३५ दलघमी) आत्तापर्यंत ११९.८४ क्युमेक्स विसर्ग

गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत ५४२.५७ क्युमेक्स विसर्ग

हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आत्तापर्यंत ३७९ क्युमेक्स विसर्ग

भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत २३.३६ क्युमेक्स विसर्ग

दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४  दलघमी) आत्तापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग

धोम- बलकवडी (सातारा) (एकूण क्षमता ११२.१४ दलघमी) आत्तापर्यंत ५८ क्युमेक्स विसर्ग

राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आत्तापर्यंत १२१  क्युमेक्स विसर्ग

ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत ४६ क्युमेक्स विसर्ग

बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग

निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत ७८.३५ क्युमेक्स विसर्ग

वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आत्तापर्यंत २२९ क्युमेक्स विसर्ग

कृष्णा-धोम (सातारा) (एकूण क्षमता 331.05 दलघमी) आत्तापर्यंत ३८ क्युमेक्स विसर्ग

काटेपूर्णा (अकोला) (एकूण क्षमता 86.35 दलघमी) आत्तापर्यंत १७.१६ क्युमेक्स विसर्ग

इराई (चंद्रपूर) (एकूण क्षमता १७२.२० दलघमी) आत्तापर्यंत ३६.४० क्युमेक्स विसर्ग

चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आत्तापर्यंत ३० क्युमेक्स विसर्ग

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे.

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी दुपारी १:५५ वाजता भरतीची वेळ देण्यात आली असून साधारण ४.९ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.

वीज कोसळण्याची शक्यता असणा-या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क  राहण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये “DAMINI” ॲप डाउनलोड व  इन्स्टॉल करावे.  हे ॲप वापरकर्त्यांना २० ते ४० किलोमीटर जीपीएस (GPS) नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते. नागरिकांनी आपत्तीचा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” App डाउनलोड व इन्स्टॉल करावे.

राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेले सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे :

फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL

ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ईमेल: controlroom@maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासनाचे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून ३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार महाराष्ट्र हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे. रेड अलर्ट म्हणजे 24 तासात २०४ मिमी पेक्षा जास्त तर ऑरेंज अलर्ट म्हणजे २४ तासात ११५ ते २०४ मिमी पाऊस असा आहे. तर येलो अलर्ट हा ६५ ते ११५ मिमी इतका अंदाजे पाऊस पडणार असेल तर देण्यात येतो. अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *