‘आरबीआय’कडून १०० अनावश्यक परिपत्रकं रद्द
नियमन आढावा प्राधिकरणाच्या शिफारशिंनुसार भारतीय रिझर्व बँकेनं १०० अनावश्यक परिपत्रकं मागे घेतली आहेत. भारतीय रिझर्व बँकेनं आज जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. अनावश्यक परिपत्रकांची समिक्षा करण्यासाठी बँकेनं या वर्षी एप्रिल महिन्यात नियमन आढावा प्राधिकरणाची स्थापना केली होती. पहिल्या टप्प्यात १५० परिपत्रकं मागे घेण्याची शिफारस या समितीनं केली आहे. नियामक मानदंडांमध्ये सुसत्रता आणण्यासाठी आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी या प्राधिकरणाची स्थापना केल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.
Source-AIR