Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“बुद्धिमत्ता ही आपली ताकद आहे, फक्त तिचा वापर दुसरीकडे होतो” –  प्रकाश जावडेकर

“बुद्धिमत्ता ही आपली ताकद आहे, फक्त तिचा वापर दुसरीकडे होतो” –  प्रकाश जावडेकर

 मुंबई: नव्या शोधांमुळे देश समृद्ध होतात, हा धडा आपण घ्यायला हवा, त्यासाठीच प्रधानमंत्र्यांनी मेक इन इंडिया ही कल्पना मांडली, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. ते काल मुंबईत एका खासगी वृत्त समूहानं आयोजित केलेल्या युवा पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

विकसित देशात नाविन्यतेला वाव दिला जातो, त्याचा उपयोग केला जातो म्हणून ते देश समृद्ध होतात असं त्यांनी सांगितलं. देशाच्या प्रगतीसाठी संशोधन आणि नावीन्यता क्षेत्रांवर भर देत, युवा प्रतिभा आणि मेहनतीला प्रोत्साहन द्यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं.

आपल्याकडे नवे शोध लावणारा युवा वर्ग  आहे, पण त्यांना आणि त्यांच्या शोधांचा स्वीकार करणारी सामाजिक मानसिकता घडायला हवी अशी गरजही त्यांनी व्यक्त केली.

बुद्धिमत्ता ही आपली ताकद आहे, फक्त तिचा वापर दुसरीकडे होतो, तो आपल्या देशासाठी व्हायला हवा असं त्यांनी नमूद केलं. यावेळी जावडेकर यांच्या हस्ते संशोधन, सामाजिक कार्य, नवउद्यमी, व्यवसाय, कला आणि मनोरंजन, कायदा सुशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या युवकांना पुरस्कार देऊन गौरवलं गेलं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *