महाराष्ट्रात लवकरच सात हजाराहून अधिक पदांसाठी पोलीस भर्ती
महाराष्ट्रात गृह खात्यातली रिक्त पदं भरण्यासाठी शासन प्रयत्नशील असून लवकरच सात हजाराहून अधिक पदांसाठी पोलीस भर्ती केली जाणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ते काल दर्यापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते.
महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित होत्या, बालमजुरी रोखण्यासाठी आणि बालकांच्या सुरक्षेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली.