पाकव्याप्त काश्मीर मध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, २२ दहशतवाद्यांसह पाक सैनिकांचा खात्मा
जम्मू आणि काश्मीर: भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान कडून वारंवार शस्त्रसंधीचे उंलंघन करण्यात येत होतं. आज सकाळी पाकव्याप्त काश्मीर मध्ये भारतीय सैन्याने मोठी कारवाई करत २२ दहशतवादी आणि ५ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तंगधार सेक्टर मध्ये पाकव्याप्त काश्मीर मध्ये शिरून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे सात तळ उध्वस्त केल्याचे कळते. तत्पूर्वी या ठिकाणी पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उंलंघन करत अंदाधुंद गोळीबार करायला सुरूवात केली. यात २ भारतीय जवानांना वीरमरण आले आणि एक सामान्य नागरिकाचेही प्राण गेले.