“देशातील मंदिसाठी पंतप्रधान कार्यालय जबाबदार”; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा थेट आरोप
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एक मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की भारत मंदीच्या गर्तेत अडकला आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थितीही मोठ्या सुस्तीच्या दिशेने इशारा करत आहे. या साऱ्या परिस्थितीला त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला कारणीभूत ठरवलं आहे. ते म्हणाले की मंत्र्यांना अधिकार नसल्यामुळे अशी बिकट परिस्थिती ओढवली आहे. एका मॅगझीन मुलाखत देताना त्यांनी हे परखड मत मांडलं आहे.