अर्थमंत्री सादर करत आहेत पूर्ण अर्थसंकल्प; देशाच्या नजरा खिळून
नवी दिल्ली: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले पाहिले बजेट सादर करत आहेत. काल समोर आलेल्या आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारावर पाहायला गेलं तर बजेट २०१९ मध्ये सरकार समोर सर्वात मोठं आव्हान देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करणं असेल आणि याला दृष्टिपथात ठेवून बऱ्याच नवीन घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री हे बजेट अशा वेळी सादर करत आहेत जेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेत कमजोरी आली आहे. कमी पर्जन्यवृष्टीची शक्यता, जागतिक बाजारातील मरगळ आणि व्यापारी युद्धाची आवाहनही जोडीला आहेत. वाढत्या व्यावसायिक ताणावामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती डगमगायला लागली आहे. बरोबर ११ वाजता सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली. हा अर्थसंकपल्प सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हासू आणतो की आसू आणतो हे पाहणे लक्षणीय ठरेल.