नीरव मोदी चा आलिशान बंगला अखेर जमीनदोस्त
देशभर गाजत असलेल्या पी.एन.बी. घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग मधील बंगला शेवटी आज जमीनदोस्त झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाने नियंत्रित स्फोट करून हा बंगला पाडला. सी.आर.झेड. चा कायदा पायदळी तुडवून जवळपास ३० वर्षांपूर्वी नीरव मोदी ने हा बंगला बांधला होता. २००९ साली जेव्हा उच्चन्यालयात त्या विरोधात याचिका दाखल झाली तेव्हाही त्यावरील कारवाईला वेळ घेतला गेला. पण जेव्हा पी.एन.बी. घोटाळा उघड झाला तेव्हा त्याच्या संपत्तीवर ईडी ने टाच आणायला सुरुवात केली. तेव्हा ह्या बंगल्याचा विषय पुन्हा चर्चेत आला. आता ह्या ह्या पाडलेल्या बंगल्याच्या जमिनीचा लिलाव करून ईडी घोटाळ्यातील नुकसानाची भरपाई करणार आहे. जवळपास ४० कोटींपेक्षा जास्त किमतीचा हा बंगला होता.