पाऊस वार्ता: येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात पडू शकतात हलक्या सारी, पण मान्सून ला अद्याप वेळ
मुंबई: पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या भारतीयांची विशेषतः दक्षिण भारताची प्रतीक्षा आता संपणार आहे. मॉन्सून श्रीलंके पर्यंत पोहोचल्याचे स्कायमेट या खाजगी संस्थेने जाहीर केले आहे. पण अजून तो केरळ मध्ये पोहोचायला वेळ आहे असेही त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात येत्या काही दिवसात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. सध्या ढगाळ वातावरण आणि दक्षिणेकडील राज्यांत थोडयाफार प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पुढच्या २४-४८ तासांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्कायमेट च्या हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रा व्यतिरिक्त नागपूर, परभणी, सांगली, सातारा इथल्या एकदोन ठिकाणी कडकडाटासह पडू शकतो.
या व्यतिरिक्त एक कमजोर ट्रफ रेषा कोकण/गोव्याच्या किनारपट्टी भागात पसरली आहे. या मुळे किनारपट्टी भागातील मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग मध्ये दाट ढगांची चादर पसरलेली राहील. या अशा वातावरणामुळे येत्या दोन दिवसात येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात.