महाराष्ट्र स्वाभिमान पक्षतर्फे निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढणार
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पहिला मेळावा काल (१५ फ्रेबु.) वांद्रयातील रंगशारदा सभागृहात पार पडला. या मेळाव्यात नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील लोकसभेच्या पाहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निलेश राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघामधून उमेदवारी देण्यात आली आहे. नारायण राणे यावेळी म्हणाले की, “देशावर इतका मोठा दहशतवादी हल्ला झाला त्यात अनेक जवान हुतात्मा झाले परंतु शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना युतीची चिंता आहे.” यांना फक्त सत्ता हवी आहे बाकी काही नको. अशा शब्दात त्यांनी संभावित युतीवर टोला मारला.
मेळावा कार्यक्रमाप्रसंगी नारायण राणे यांनी पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.