“इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही”; बीड मधील वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची सारवासारव
बीड/मुंबई: काल बीड येथे ‘सीएए-एनारसी’ विरोधी सभेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यावेळी ते म्हणाले की, “आणीबाणीच्या माध्यमातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता.” त्यांच्या भाषणातील या एका वाक्याने राजकीय वादंग मजला. काँग्रेसकडूनही यावर राष्ट्रवादीला इशारा देण्यात आला.
राजकीय वादळ उठल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपल्या स्पष्टीकरणात ते म्हणाले की, “इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वा बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे.
त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळपास हि पोहचू शकत नाही.”
इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वा बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे.
त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळ. पास हि पोहचू शकत नाही pic.twitter.com/X97RZK9J9o— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 29, 2020