‘फळं रात्री का खाऊ नयेत?’ या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी क्लीक करा
आयुर्वेद कुतूहल
आयुर्वेदात नित्य सेवनासाठी मुख्यतः दोनच फळांचा उल्लेख आहे ते म्हणजे आवळा आणि डाळिंब, परंतु ऋतूनुसार फळांचे सेवनही तितकेच महत्त्वाचे आहे असे आयुर्वेद मानते. ती फळे खाण्याच्या हि काही पद्धती आहेत.
१) सर्वप्रथम फळे हि रात्री खाण्यास मनाई आहे ती सकाळ, दुपार व संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खाणे योग्य आहे.
२) फळे हि जेवणा नंतर कधीही खाऊ नयेत, ती नेहमी जेवणा आधीच खावीत.
३) अनेक वेळा आपण फळांचा रस घेतो, आयुर्वेदात स्वरस म्हणजे Juice हे पचायला अधिक जड असतो, म्हणूनच शक्यतो फळे अशीच खावीत जेणे करून त्यातील फायबर, Cellulose आदि घटक पाचन क्रिया सुलभ करतात आणि कॉन्स्टिपेशन(जुलाब) होऊ देत नाहीत.
४) आयुर्वेदात फळे व दुध एकत्र खाण्यास मनाई आहे. फळ कितीही गोड असले तरी त्यात किंचित आंबटपणा असतो आणि त्यामुळेच दूध आणि फळे एकत्र सेवनास मनाई आहे. ह्यामुळे पचनाचे, त्वचेचे विकार उद्भवू शकतात. म्हणूनच मिल्क शेक, फ्रुट सलाड विथ मिल्क ह्या गोष्टी आयुर्वेदास मान्य नाहीत, तसेच एका दिवसात दूध व फळे खाणार असू तर त्यात योग्य अंतर राखुन खावेत. शिकरण करताना केळ्यात दुधा ऐवजी नारळाच्या दुधाचा वापर करावा.
५) आंबट रसाचे असले तरी सुद्धा आवळा चूर्ण सोडले तर बाकी कोणतीही फळे दह्या सोबत देखील खाऊ नयेत. दही मुळातच पचायला जड असते त्यात फळे एकत्र केल्याने पाचन क्रिया बिघडू शकते, ह्यामुळेच फ्रुट सलाड विथ योगर्ट, फ्रुट योगर्ट हे सुद्धा आयुर्वेदात सेवनास मनाई आहे.
वरील नियम हे क्वचित प्रसंगी पाळले नाहीत तर ठीक पण ह्यांची सतत अवहेलना करू नयेत, आयुर्वेदात आहाराचे नियम हे मानवाची प्रकृती ह्यावर आधारित आहेत आणि त्यांच्या पालनाने नक्कीच आपणास लाभ होईल तेव्हा यापुढे फळांचे सेवन करताना ह्या नियमांचा विचार अवश्य करावा.
लेख आवडला असल्यास शेअर करा । LIKE करा । कंमेंट करा
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)