काँग्रेसप्रणित ‘एनएसयुआय’ च्या कार्यकर्त्यांनी केली दिल्लीत वीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना
नवी दिल्ली: काँग्रेस प्रणित ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ च्या कार्यकर्त्यांनी काल दिल्ली विद्यापीठातर्फे उभारलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. सदर घटनेनंतर देशभरातील सावरकर प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
दिल्ली विद्यापीठात अभाविप च्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शहीद भगतसिंग यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. हे पुतळे बसवताना सावरकरांच्या पुतळ्याला ‘एनएसयुआय’ ने आक्षेप घेतला होता.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यातल्या तारुण्यातली मौल्यवान वर्ष ज्या क्रांतीकारकाने खर्च केली. जी व्यक्ती शेकडो क्रांतिकारकांची प्रेरणास्थान राहिली ज्यात शहिद भगत सिंग व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही समावेश होतो त्याची मृत्यूपश्चात अशी अवहेलना होणे हे दुःखदच.