केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचं प्रतिपादन
नाशिक: देशात कोणतीही व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये हे सरकारचे धोरण असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केलं. जन आशीर्वाद यात्रेच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसींचं उत्पादन करण्यात येत असून ५५ कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन नव्यानं २३ हजार कोटींची तरतूद जाहीर करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. नवीन लसींना परवानगी देतांना विविध सुरक्षा मानांकनं, लसीच्या चाचण्या आणि परिणामकारकता याचा अभ्यास करूनच परवानगी देण्यात येते असं पवार म्हणाल्या.