अयोध्या राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल थोड्यात वेळात, सर्व पक्षांकडून शांतता राखण्याचे आवाहन
नवी दिल्ली: थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालय अयोध्या प्रकरणी आपला निर्णय सुनावणार आहे. न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायालयात पोहोचले आहेत.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः उत्तरप्रदेशात राखीव पोलीस दलाच्या जादा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. देशभरातही हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असून सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांकडून निर्णय काहीही आला तरी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करत म्हटले आहे की न्यायालयाचा निकाल हा कुणाची हार आणि कुणाची जीत नसून देशवासियांनी शांतता राखावी. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही न्यायालयाच्या निकालाचा आदर राखण्याचे आवाहन केले होते.