अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा 24 तासांत चक्री वादळात होण्याचा हवामान खात्याचा अंदाज
मुंबई, दि. 6: गुजरातच्या पोरबंदर इथं दक्षिण-आग्नेय अरबी समुद्रावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकण्याची आणि त्याचं रूपांतर पुढील 24 तासांत चक्री वादळात तीव्र होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान विभाग अर्थात IMD ने सांगितलं की, आज सकाळी कमी दाबाचा पट्टा गोव्याच्या 920 किलोमीटर पश्चिम-नैऋत्येस, मुंबईच्या 1 हजार 120 किलोमीटर दक्षिण-नैऋत्येस आणि पोरबंदरपासून 1 हजार 160 किलोमीटर दक्षिणेकडे केंद्रित झाला होता. आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा प्रभाव केरळ किनारपट्टीच्या दिशेने वाढत आहे यामुळे सहाजिकच मान्सूनच्या वेगावर याचा परिणाम होईल.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये जरी मान्सूनचं आगमन उशीरा झालं तरी देशाच्या इतर भागात मान्सून उशीरा पोहोचेल असं नाही तसचं देशभरातील एकूण पावसावरही याचा परिणाम होणार नाही असं ‘आयएमडी’ ने म्हटलं आहे. भारतामध्ये एल निनोची परिस्थिती असूनही नैऋत्य मोसमी हंगामात सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा, असल्याचं IMD नं या पूर्वी सांगितलं होतं.
Source – AIR