आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा जळगावातून आजपासून शुभारंभ
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आजपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करत आहेत.
शिवसेनेला ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले त्यांचे आभार मानायला व ज्यांनी मतदान केले नाही त्या मतदारांची मने जिंकण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रभर हा दौरा केला जाणार असल्याचे शिवसेनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात आज दिनांक 18 जुलै 2019 रोजी जळगाव येथून होणार आहे या जन आशीर्वाद यात्रेचे पहिल्या टप्प्यात जळगाव-धुळे-नाशिक-नगर अशा चार जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेदरम्यान विविध ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे युवकांशी संवाद साधणार आहेत.
जन आशीर्वाद यात्रा साधारण चार हजार किमी इतका प्रवास करणार आहे