Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जे राष्ट्रहिताचे मुद्दे असतील त्यांनाच शिवसेनेचा पाठिंबा असेल – आदित्य ठाकरे

जे राष्ट्रहिताचे मुद्दे असतील त्यांनाच शिवसेनेचा पाठिंबा असेल – आदित्य ठाकरे

नाशिक: भारतीय जनता पक्षाने शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, राम मंदिर या तीन प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतरच शिवसेनेने त्यांच्यासोबत युती केली. युती झाली म्हणून मतभेद मिटलेत, असे नाही. नोटाबंदीस आमचा अजूनही विरोध आहे, असं वक्तव्य युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले आहे. नाशिक येथे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी(७ एप्रिल) डोंगरे वसतिगृहाच्या मैदावर आयोजित आदित्य संवाद या कार्यक्रमात ते बोलते होते.

जे राष्ट्रहिताचे मुद्दे असतील त्यांनाच शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी शिवसेनेची भूमिका आदित्य ठाकरे यांनी तरुणांसमोर मांडली. हिंदुत्ववादी व विकासवादी पक्ष एकत्र आल्याने देशाचा नक्कीच फायदा होईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आदित्य संवाद या कार्यक्रमात बोलताना राज्यात पुन्हा एकदा युतीच सरकार येईल असा विश्वास देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *