संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्याबाहेरच्या यंत्रणेकडे सोपवण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारकडे मागणी
मुंबई/बीड, दि. ०२: मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्याबाहेरच्या यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणात पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली.
Source – AIR
