Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी साधला मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद

Aaditya T At Marathwada Visit

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी साधला मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांनी
लातूर व उस्मानाबादच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवसेना नेहमी तुमच्या सोबत असेल असे आदित्य ठाकरे यांनी लातूर जिल्हातील शेतकऱ्यांना यावेळी सांगितलं.

मला शेतीतील फार काही समजत नसलं तरी मात्र शेतकऱ्यांचं दुःख आम्हाला कळतं. त्यासाठीच हा दुष्काळी भागाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करतात याकडे न पाहता शिवसेना नेहमीच तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. सध्या राज्यात दुष्काळाचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी पाणीटंचाई, चाराटंचाईने त्रस्त होत आहे, अशावेळी कोणत्याही शेतकऱ्यांने आत्महत्येचा विचार मनात आणू नये. जेव्हा कधी हि तुम्ही संकटात असाल तेव्हा शिवसेनेला हक्काने आवाज द्या शिवसेना नेहमी तुम्ही मदतीला धावून येईल.

राज्यातील शेतकऱ्यांनचे सरसकट कर्ज माफ व्हावे यासाठी लवकरच योग्य ती भूमिका शिवसेना घेईल, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले. आदित्य ठाकरेंनी उस्मानाबाद जिल्ह्यातील येनेगूर, सालेगाव, जेवळी, नारंगवाडी तसेच लातूर जिल्ह्यातील किल्लारी, बुधोडा, लामजाना, औसा, चलबुर्गा व बुधोडा या गावांना भेटी दिल्या.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *