दिवंगत मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल यांचे भाजपला कडू बोल
पणजी: गोव्यात सध्या राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. गोव्यात काँग्रेस च्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या विषयावर माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी स्वपक्ष भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पक्षातून सध्या विश्वास आणि वचनबद्धता सारखे शब्द संपले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे.
मनोहर पर्रीकर हयात असताना भाजपात विश्वास आणि वचनबद्धता सारख्या शब्दांना महत्व होतं. ती पक्षाची मूल्य होती. १७ मार्च रोजी मनोहर पर्रिकरांचं निधन झालं आणि हे दोन्ही शब्द गायब होऊन पक्षाने वेगळीच दिशा पकडली. आता काय योग्य आज हे वेळच ठरवेल असे उत्पल पर्रीकर म्हणाले.