“आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबई बाहेर जाऊ नका” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे गिरणी कामगारांना आवाहन
मुंबई: मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आता सुटला असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ३ हजार ८९४ सदनिकांची सोडत जाहीर झाली. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यामधील गिरणी कामगारांना घरे देण्याचा शासनाचा धोरणात्मक निणर्य आहे.
या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे योगदान आहे त्यामुळे प्रत्येक गिरणी कामगाराला घर कसे मिळेल ते आम्ही पाहुत असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबई बाहेर जाऊ नका असे आवाहन त्यांनी केले.”
या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन आहिर व शिवसेना उपनेते विजय नाहटा उपस्थित होते.