महाराष्ट्रासह अनेक राज्यांना वादळी वारे आणि पावसाचा तडाखा, पिकांचे मोठे नुकसान
देशातील अनेक राज्यांत काल, मंगळवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये गेले ३-४ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे देशभरात आतापर्यंत ३५ जणांनी प्राण गमावले आहेत.
गुजरात, मध्य प्रदेशात जीवितहानी झाली असून या ठिकाणी सुमारे २८ जणांचा मृत्यू आहे. वादळी पावसासह अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजस्थानमध्ये वादळी पावसामुळे ६ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.