राष्ट्रीय युवक दिनानिमित्त जाणून घ्या स्वामी विवेकानंदांबद्दल
“स्वामी विवेकानंद”
स्वामी विवेकानंदांचे मुळचे नाव नरेंद्र. रामकृष्ण परमहंससारख्या तपस्वींनी, श्रेष्ठ गुरूंनी त्यांना “विवेकानंद” हे नाव दिले. लहानपणापासूनच नरेंद्र तल्लख बुद्धीचा, संवेदनाक्षम व विचारी ! काहीसा एक्कल कोंडा पण तेजस्वी होता. त्याने भारतीय संस्कृती, धर्म, रीती भाती इ.चा सखोल अभ्यास केला. वाचनाची प्रचंड आवड, उत्कृष्ट वक्ता! त्याच्या शब्दांनी परकीयांना मोहून टाकले. प्राथमिक गरजांची पूर्ती करणारे शिक्षण स्वामींना अभिप्रेत होते. भारतातील आध्यात्म आणि पाश्चात्यांचे विज्ञान एकत्र आल्यास भारत जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र ठरेल. त्यासाठी परदेशात जाऊन विद्यार्थाने शिकावे व शिकवावे असे त्यांचे विचार होते.
नव-नवीन विचार रोज आत्मसात करावेत. मनोंनिग्रह हवा. त्यासाठी मन-साक्षरता जरुरी, मुलांना योग्य स्वातंत्र्य देणे गरजेचे, वृत्तीमध्ये सतत बदल व्हावे तरच देशाची उन्नती होईल. असे त्यांचे मत होते. प्रत्येक स्त्री मधे पुरुषतत्वे असतात. तसेच प्रत्येक पुरुषात स्त्री तत्वे असतात. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता मानणे गरजेचे आहे असे ते म्हणत! वृत्तीने संन्यस्त होते, पण सर्व विषयांचा सखोल अभ्यास होता. विचार परखड, वाणी शुद्ध, स्पष्ट, अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी कलकत्त्या जवळ हुबळी नदीच्या काठी बेल्लूर मठाची स्थापना केली. ते हिंदुत्ववादी होते. मानवतावादाचा, तत्वाचा प्रसार करून त्यांनी साऱ्यांना मार्गदर्शन केले.
आजचा दिवस स्वामी विवेकानंद जयंती तसेच ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा करतात.
माहिती संकलन: प्राची तुंगार