Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची भेट घेऊन चर्चा करणार – गृह मंत्री अनिल देशमुख

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची भेट घेऊन चर्चा करणार – गृह मंत्री अनिल देशमुख

साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भावनांशी सहमत असल्याची दिली प्रतिक्रिया

मुंबई, दि. ११ : ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी देशातील धोरणकर्त्या वर्गाला केलेले आवाहन विचार करण्यासारखे आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि वैचारिक क्षेत्राचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या या मंचाच्या अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या भावनांची दखल घेऊन त्याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांच्याच सोयीने ही भेट होईल, अशी माहिती गृह मंत्री श्री. अनिल देशमुख यांनी दिली.

देशातील ढासळत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविरोधात मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन काल आवाज उठवला. धर्मांध वातावरण, वाढती असहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच, गोहत्येच्या संशयावरुन अल्पसंख्याकांचे घेतले जाणारे सामूहिक बळी (मॉब लिंचींग), विरोधात मत मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे आणि जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण या सर्व प्रकाराविरोधात साहित्यिकांनी ताशेरे ओढून देशातील परिस्थितीवर हल्ला चढवला. देशाला वेढीस धरले जात आहे अशी टिका केली. फादर दिब्रिटो यांच्यासह संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर, कवियित्री अनुराधा पाटील आदींनी देशातील सद्यपरिस्थितीवर टिका केली.

याअनुषंगाने मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, भारतीय लोकशाहीची फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केलेली वैचारिक मांडणी म्हणजे आज देशातील राजकारणासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांना समजावून घेण्याची सोपी वाटच आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला स्पष्ट, परखड आणि कणखर विचार व्यक्त करण्याची फार मोठी परंपरा आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सर्व भेदांच्या पलिकडे जाऊन या देशाच्या भल्याची सर्वसमावेशक भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राची प्रतिष्ठा उंचावणाऱ्या त्यांच्या या भाषणाने सर्वच राज्यकर्त्यांना जबाबदारीचे भान दिले आहे. त्याची दखल देशपातळीवर घेतली जाईल, अशी आशा आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची दखल घेऊन त्याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मी त्यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांच्याच सोयीने ही भेट होईल, असे मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *