“……तोपर्यंत शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देणार नाही” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणलं होतं. यावेळी शिवसेनेने या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं होतं. पण आज शिवसेनेने या विधेयकाच्या स्पष्टतेबाबात आक्षेप घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “नागरिकता सुधारणा विधेयकातील अनेक बाबी अस्पष्ट आहेत. जोपर्यंत त्याबाबतची सत्यता आणि स्पष्टता होत नाही, तोपर्यंत शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या विधेयकामुळे देशातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असेल तर त्यांच्या मनातील संभ्रम दूर करणे गरजेचे आहे. देशातील नागरिकांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे या विधेयकात स्पष्टता येत नाही, तोपर्यंत या विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.”