Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षानं बरंच काही दिलं, मात्र बंडखोरांबद्दल आपला अंदाज चुकला” – शरद पवार

“सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षानं बरंच काही दिलं, मात्र बंडखोरांबद्दल आपला अंदाज चुकला” – शरद पवार

नाशिक, दि. ८: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राजकीय आणि कौटुंबिक अशा दोन्ही बाजूंनी अडचणीतून जात आहेत. परंतु, त्यांनी या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी राजव्यापी दौरा करण्याचे जाहीर केले. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी फुटीर नेते छगन भूजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच येवला नाशिक येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्याआधी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी शरद पवार म्हणाले, “लालकृष्ण अडवाणींकडे पक्षाची कमान सोपवताना वाजपेयीजी म्हणाले होते, “मी थकलो नाही आणि निवृत्तही होणार नाही, पण आता अडवाणींच्या नेतृत्वाखाली विजयाकडे वाटचाल करू.” शरद पवार यांचा संदर्भ अजित पवार यांच्या विधानाचा होता ज्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचे वय आणि तब्येत यावर प्रश्न उपस्थित केले होते. याआधी शरद पवार म्हणाले होते की, मी ८२ वर्षांचे असो वा ९२ वर्षांचा असो मी आजही प्रभावी आहे.

सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षानं बरंच काही दिलं, मात्र बंडखोरांबद्दल आपला अंदाज चुकला अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पवार यांनी या दौऱ्याला सुरुवात केल्यानंतर क्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे, भिवंडी, पडघा, शहापूर, इगतपुरी आणि इतर ठिकाणी पवार यांचं स्वागत केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *