रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ५० बेसिस पॉईंट ची वाढ
मुंबई, दि.८: रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेला संघर्ष अन्नधान्यांच्या महागाईला कारणीभूत ठरला आहे, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समितीने आज महत्त्वाच्या व्याज दरांबाबत निर्णय जाहीर केला त्यावेळी ते मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. महागाईवर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ५० बेसिस पॉईंट ची वाढ केल्याचं, ते म्हणाले.
२०१६ मध्ये भारताने महागाई लक्ष्यीकरण चौकट स्वीकारल्यापासून सर्वात आव्हानात्मक टप्प्याला तोंड देण्यासाठी, ही समिती, महागाई आणि वाढीचा अंदाज तसंच इतर धोरणात्मक उपायांसाठी विविध निर्णय घेते. महागाईवर नियंत्रण आणण्याचा RBI चा प्रमुख उद्देश असल्याचं दास यांनी तज्ञांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल माध्यमांना माहिती देताना सांगितलं. प्रमुख व्याज दर ठरवण्यासाठी समितीची सहामाही बैठक सोमवारपासून मुंबईत सुरू झाली आहे.