हे ‘९’ प्रश्न राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजप ला विचारले
१) डोकलाम येथील तणावानंतर भारतीय जनता पक्षाच्या फुलबाज्या ओरडत होत्या की चायनीज माल बंद करा. मग सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधून का बनून आला? आम्हाला कळू तर दे देशद्रोही घरात आहेत का बाहेर?
२) मोदी म्हणाले होते सीमेवरच्या सैन्यापेक्षा व्यापारी जास्त शूर आणि धाडसी असतो. हे बोलताना मोदींना लाज नाही वाटत?
३) काँग्रेसच्या काळात राफेलची किंमत जितकी होती त्यापेक्षा आत्ता जास्त का आहे? काँग्रेसच्या काळात फक्त राफेलचा सांगाडा विकत घेणार होते आणि मोदींनी इंजिन बसवायला घेतलं म्हणून किंमत वाढली का?
४) ज्या वैमानिकांनी धाडसाने बालाकोट हवाई हल्ले केले, त्या वैमानिकांच्या कर्तृत्वावर शंका घेताय असं म्हणून की राफेल विमान असती तर परिस्थिती वेगळी असती. राफेल घ्या किंवा घेऊ नका, अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलचं कॉन्ट्रॅक्ट का दिलं ह्याचं उत्तर द्या?
५) पुलवामा येथे जे घडलं त्याची पूर्वसूचना गुप्तचर विभागाने दिली होती पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. जर पूर्वसूचना मिळून देखील जर काही कारवाई होत नसेल आणि आमचे जवान हकनाक मारले जाणार असतील तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे जबाबदार नाहीत का?
६) पुलवामा येथील हल्ल्यात ४० जवान मारले गेले, आणि आम्ही तरीही प्रश्न नाही विचारायचे?
७) २७ डिसेंबर ला अजित डोवाल आणि पाकिस्तनाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे बँकॉक येथे भेटले. काय झालं ह्या बैठकीत?
८) नरेंद्र मोदी आणि त्यांचे भारतीय जनता पक्ष हे ठरवणार की राष्ट्रभक्त कोण ते? तुम्हाला कोणी अधिकार दिला हे ठरवण्याचा? नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त ना, मग नवाझ शरीफला त्याच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेले?
९) अजित डोवलांच्या मुलाचा पार्टनर पाकिस्तनी आहे, हा पार्टनर चालतो का भाजपला? हा देशद्रोही नाही?