“मागील पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारनं केलेले गैर व्यवहार समोर येऊ लागले आहेत” – पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
नाशिक: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली.
मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेले गैर व्यवहार समोर येऊ लागले आहेत. अधिका-यांच्या बदल्या, समृद्धी महामार्ग अशी एक एक प्रकरणं आता समोर येऊ लागली असून, ही सर्व प्रकरणं आम्ही बाहेर काढू असं ते म्हणाले.
यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या गांधी शांतीयात्रेचं आज नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Credit-AIR