Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरण-पनवेल रेल्वेचे काम हे माझ्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले आहे – खा. श्रीरंग बारणे

उरण-पनवेल रेल्वेचे काम हे माझ्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले आहे – खा. श्रीरंग बारणे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काळेवाडी फाटा येथे जाहीर सभा झाली. देशद्रोह करणाऱ्यांना युती फासावर लटकणार हे आमचं ध्येय आहे आणि त्यासाठी श्रीरंग बरणेंना पुन्हा खासदार होण्याची संधी द्या असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी मावळकरांना केले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. देशाचा विकास डोळ्यासमोर ठेवून मी मावळ मतदारसंघात एकनिष्ठने काम करत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मावळमधील सर्वाधिक प्रश्न संसदेमध्ये मांडत त्यावर तोडगा काढण्याचे काम आम्ही केले.

देशात जवळपास ५० वर्ष काँग्रेसची सत्ता होती. पण लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम आमच्या सरकारने केले. कर्जत भागातील दुर्गम भागामध्ये सत्तर वर्षांनंतर वीज पोहोचवण्याचे काम माझ्या पाठपुराव्याने झाले आहे.

शासकीय पैसा न वापरता पवना धरणातील गाळ उपसा करण्याचे काम लोकसहभागाने केले आहे तसेच दामोदर हरी चाफेकर यांच्या नावाचे तिकीट मी, उरण येथील रस्त्याचे काम असो किंवा उरण-पनवेल रेल्वेचे काम हे सर्व माझ्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले.

घराणेशाहीला पाठिंबा द्यायचा कि देशहिताला हे आता तुम्हीच ठरवा? असा सवाल देखील बारणे यांनी यावेळी उपस्थितांना केला. मावळचा आतापर्यंचा विकास डोळ्यांसमोर ठेवून आपण मतदान करावे, असे आवाहन श्रीरंग बारणे यांनी केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *