उद्यापासून राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षा होणार सुरू
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ५७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. त्यात सात लाख ९२ हजाराहून अधिक विद्यार्थी आणि सहा लाख ६४ हजाराहून अधिक विद्यार्थिनी असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी १० मिनिटं आधी प्रश्नपत्रिका न देता परीक्षेनंतर १० मिनिटं वाढवून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.