औरंगाबाद जिल्ह्यातली टाळेबंदी प्रशासनाकडून अखेर स्थगित
टाळेबंदीच्या नियमात राज्यस्तरावरुन काही बदल करण्यात आले असून, या बदलाची सूचना मिळेपर्यंत प्रधान सचिव आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार टाळेबंदी रद्द करत असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने नऊ एप्रिलपर्यंत टाळेबंदी जाहीर केली होती. मात्र या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होत होता.
जिल्ह्यात आतापर्यंत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य केले, यापुढेही असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात अंशत: टाळेबंदीचे नियम कायम राहणार आहेत. त्यामुळे रात्री आठ वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवता येतील, जमावबंदीही कायम आहे.
टाळेबंदीविरोधात जलिल यांनी आज पुकारलेले आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगितले. कोरोना विषाणू अजून पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे नागरीकांनी मास्क वापरण्यासह इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन खासदार जलिल यांनी केले आहे.