Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

औरंगाबाद जिल्ह्यातली टाळेबंदी प्रशासनाकडून अखेर स्थगित

औरंगाबाद जिल्ह्यातली टाळेबंदी प्रशासनाकडून अखेर स्थगित

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्रीपासून लागू होणारी टाळेबंदी स्थगित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल रात्री पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

टाळेबंदीच्या नियमात राज्यस्तरावरुन काही बदल करण्यात आले असून, या बदलाची सूचना मिळेपर्यंत प्रधान सचिव आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार टाळेबंदी रद्द करत असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने नऊ एप्रिलपर्यंत टाळेबंदी जाहीर केली होती. मात्र या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होत होता.

जिल्ह्यात आतापर्यंत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य केले, यापुढेही असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात अंशत: टाळेबंदीचे नियम कायम राहणार आहेत. त्यामुळे रात्री आठ वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवता येतील, जमावबंदीही कायम आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचे खासदार इम्तियाज जलिल यांनी स्वागत केले आहे. टाळेबंदीमुळे गोरगरीबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत, त्यांनी टाळेबंदीला विरोध दर्शवला होता.

टाळेबंदीविरोधात जलिल यांनी आज पुकारलेले आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगितले. कोरोना विषाणू अजून पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे नागरीकांनी मास्क वापरण्यासह इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन खासदार जलिल यांनी केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *