कांचन कुल झाशीची राणी आहेत – मुख्यमंत्री फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर व बारामती येथील उमेदवार कांचन कुल उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढणाऱ्या कविता कुल यांना झाशीच्या राणीची उपमा दिली. ते म्हणाले की कविता कुल या झाशीची राणी आहेत व त्या बारामतीत कमल फुलवणारच. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की शरद पवारांकडे एवढी वर्ष पश्चिम महाराष्ट्र व सिंचन खाते होते पण त्यांनी सिंचन प्रकल्प मार्गी लावले नाहीत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने या विभागातील प्रकल्प मार्गी लागले.