जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण, जाणून घ्या इतिहास
भारतीय इतिहासातील एक दुर्देवी घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. आजच्या दिवशी (१३ एप्रिल) ब्रिगेडियर जनरल डायरच्या राक्षसी आदेशाने झालेल्या अंधाधुंद गोळीबाराने अमृतसरची माती रक्ताने माखली गेली आणि संपूर्ण भारताला सुन्न केले.
जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅफ्टन अमरिंदर सिंग आदी उपस्थिती लावली आणि श्रद्धाजली वाहिली.
१३ एप्रिल १९१९ या दिवशी शिखांच्या बैसाखी या पवित्र सणाचा दिवस होता. त्यादिवशी हजारो लोक अमृतसरच्या सुवर्णमंदिराच्या दर्शनासाठी आले होते. हळुहळु त्यांची पावले जालियनवाला बागेकडे वळू लागली. हजारोंचा समूह जमला आणि त्याचे रुपांतर एका विराट शांतिपूर्ण सभेत झाले. ही बातमी लागताच ब्रिगेडियर जनरल डायर तिथे सैनिकांसह आला. त्याने बागेला चारही बाजूने वेढले आणि आतील लोकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अंधाधुंध गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एकूण सोळाशे पन्नास राउंड फायर करण्यात आले. संपूर्ण बाग रक्ताने माखली गेली. या घटनेत १००० लोकांचा मृत्यू झाला होता.
#Jalliyanwalabagh #maharashtravarta