नाना पटोलेंनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपलेला नाही – नितीन गडकरी
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडून काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये नाना पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. नाना पटोले यांच्या उमेदवारीवर नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
“नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपत नाही, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.” अशी प्रतिक्रिया केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये दिली. काँग्रेस पक्षाला आपला उमदेवार ठरवण्याचा अधिकार आहे तसेच सगळ्यांना निवडणूक लढण्याचा हक्क आहे मी कोणावरही टीका करणार नाही. मी राजकारणात कधीच कोणासोबत वैयक्तिक दुश्मनी ठेवली नाही.
नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी सरळ लढत होणार असल्याने सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे लागून आहे.