आयुर्वेद कुतूहल
वाचा ही ७ ‘रहस्य’ डोळ्यांची उत्तम निगा राखण्यासाठी
१) आयुर्वेदात डोक्यावरून कडक गरम पाण्याने आंघोळ करणे निषिद्ध आहे, ह्यामुळे डोळे आणि केस ह्यांना इजा होऊ शकते.
२) आयुर्वेदात सकाळी ब्रश करण्याआधी व नंतर तोंडामध्ये पाणी धरून डोळ्यांवर पाणी मारण्यास सांगितले आहे. हे पाणी साधेच असावे, ह्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो व डोळे स्वच्छ होतात. हि क्रिया दिवसातून ३-४ वेळा तरी करावी फक्त पाण्यात अधिक क्लोरीन असल्यास ते डोळ्यांना इजा करते म्हणून पाणी फक्त पापण्यांवर मारावे.
३) सतत संगणक अथवा T. V. तसेच मोबाईल ह्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो, मोबाईल आणि टी. व्ही. वापराचे आपण प्रमाण कमी करू शकतो परंतु ज्यांचे कामच संगणकावर आहे अशा व्यक्तीने U V rays protector चष्मे वापरावेत, परंतु त्याच बरोबर रात्री झोपताना पापण्यांना एरंडेल तेल / गाईचे तूप लावावे जेणे करून डोळ्यांचा थकवा कमी होतो, आठवड्यातून दोन तीन वेळा हि क्रिया करावी.
४) दृष्टी सुधारण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी त्रिफळा चूर्ण एक चमचा तूप व माधासोबत रात्री घ्यावा. तुपाचे प्रमाण अधिक असावे, तूप हे गाईचे असावे, काही जणांना तूप अथवा त्रिफळा ने देखील त्रास होतो अशा व्यक्तींनी वैद्याचा सल्ला अवश्य घ्यावा.
५) डोळ्यांसाठी काजळ तितकेच आवश्यक आहे, वैद्याच्या सल्ल्याने आठवड्यातून एकदा तरी औषधी काजळ डोळ्यात घालावे.
६) पादाभ्यंग म्हणजे तळ पायांना तेल चोळणे हि क्रिया रात्री करावी ह्याने डोळ्यांना बल मिळते व दृष्टी सुधारते, ह्यासाठी काही जण कोकमाच तेल वापरतात.
७) डोळ्यांसाठी विरेचन ,नस्य, अश्चोतन, तर्पण हि पंचकर्मे आवश्यक असतात वैद्याच्या सल्ल्याने ती अवश्य करून घ्यावीत
वरील सर्व गोष्टी ह्या डोळ्यांच्या काळजी घेण्यासंबंधीत आहेत, परंतु जर आधीच कोणता डोळ्यांचा व्याधी असल्यास वैद्याच्या सल्ल्याशिवाय वरील उपाय करू नयेत.
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
shardulchavan88@gmail.com
जगदंब The Ayurvedic World ,
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)