Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“वडपे ते ठाणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या” – मंत्री दादाजी भुसे

“वडपे ते ठाणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या” – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २५: वडपे ते ठाणे आठ पदरी रस्त्याचे काम  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजूर केले आहे. या रस्त्याचे आठ पदरी रुंदीकरणाचे  काम सुरू असल्याने येथे वाहतूक कोंडी होत असून यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य रईस शेख, बाळासाहेब थोरात, अस्लम शेख, नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.

मंत्री भुसे म्हणाले की, या रस्त्याचे काम जवळपास ३० टक्के पूर्ण होत आले आहे. उर्वरित काम ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण होईल. पावसाळ्याच्या काळात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत राहील यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, पोलीस, परिवहन, महामार्ग, सर्व संबंधित यंत्रणांना या महामार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने उपयोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे अशा ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डने तातडीने वाहतूक कोंडी सोडवण्यात यावी आणि रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, अशा सूचनाही देण्यात येतील, असे मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *