Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला” वाचा का खासदार छ. संभाजीराजे संजय राऊत यांच्यावर भडकले

“उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला” वाचा का खासदार छ. संभाजीराजे संजय राऊत यांच्यावर भडकले

मुंबई/कोल्हापूर: भाजपच्या दिल्लीतील काल प्रकाशित झालेल्या “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकावरून एव्हाना गदारोळ सुरू झाला असून. संबंध महाराष्ट्र व देशभरात याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या विषयी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवरायांच्या वंशजांनी प्रतिक्रिया द्यावी असे आवाहन केले होते. याबाबत कोल्हापूर गादीचे वंशज असलेले भाजप राज्यसभा खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी सिंदखेडराजा येथे जाहीर सभेत भाजपचे नाव न घेता पक्षप्रमुखांना इशाराही दिला. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणं माझ्यासाहित सर्वच शिवभक्तांना अजिबात आवडलेलं नाही.”

पुढे ते म्हणाले की, “ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील.”

पण ही प्रतिक्रिया बहुधा संजय राऊत यांनी पहिली नसावी व या पुस्तक प्रकाशनावर आपली वरील रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली. यानंतर खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेमुळे भडकलेल्या खासदार संभाजीराजे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करत संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत राग व्यक्त केला.

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, “उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.”

यावर थोड्याच वेळापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट खासदार संभाजीराजेंना ट्विट करत काही प्रश्न केले. ते म्हणाले, “मा.छत्रपती संभाजी राजे
आम्ही आपला नेहमीच आदर करतो..संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले ?ज्या मुळे छत्रपती घराणयाचा अवमान झाल?हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने च चालत आहे. सदैव चालत राहिल.धन्यवाद आणि जय महाराष्ट्र”

आता हा वाद असाच पुढे चालू राहणार की यावर पूर्णविराम पडणार हे येत्या काळात कळेलच.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *