९२.७१ टक्के विद्यार्थी झाले उत्तीर्ण
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी इयत्तेच्या परीक्षेचे निकाल आज जाहीर करण्यात आले. देशभरातुन १४ लाख ३५ हजार ३६६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९२ पूर्णांक ७१ शतांश विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधील मुलांचं प्रमाण ९१ पूर्णांक २५ शतांश असून मुलींच प्रमाण ९४ पूर्णांक ५४ शतांश आहे. या निकालातले ३० टक्के गुण पहिल्या सत्राचे असून ७० टक्के गुण दुसऱ्या सत्राचे मोजले असल्याचं मंडळानं म्हटलं आहे. यावेळी ३३ हजाराहून जास्त विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत तर १ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून जास्त गुण कमावले आहेत.