हे सरकार मला चक्रव्यूहात अडकवतंय, राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करतंय – अशोक चव्हाण
नांदेड: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात या सरकारकडून मला चक्रव्यूहात अडकवत राजकीयदृष्ट्या संपूर्णपणे मला संपवण्याचा प्रयत्न होत आहे, तेव्हा विचारकरून मतदान करा, असं आवाहन नांदेड लोकसभा मतदार संघातले उमेदवार अशोक चव्हाण यांनी मतदारांना केलं आहे. नांदेडमधील भोकरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.
भाजप सरकार सध्या केंद्रात आणि राज्यात कार्यरत आहे. त्यामुळे हे सरकार मुद्दाम राज्यात जेथे काँग्रेसचे वर्चस्व
असलेल्या ठिकाणची विकास कामं रोखत आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
मला राजकीयदृष्ट्या संपूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण मी तुमचा आहे, तुमचा आशिर्वाद सदैव माझ्यासोबत आहे. मी नेहमी तुमच्यातच राहणार आणि तुमच्यातच मरणार, असे भावनिक वक्तव्य अशोक चव्हाणांनी यावेळी केले.
२०१४ च्या निवडणूकीनंतर अशोक चव्हाण हे पुन्हा रिंगणात उतरलेले काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवताना पक्षाची इज्जत वाचवण्याचं आव्हान अशोक चव्हाणांसमोर आहे.