अरुण जेटली यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लेटर बॉम्ब, म्हणले मला नवीन जबाबदाऱ्या देऊ नका
नवी दिल्ली: भाजप चे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांनी आज बुधवार दि.२९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून नवीन सरकारमध्ये कोणतीच जबाबदारी देऊ नये अशी विनंती केली आहे. अरुण जेटली यांनी या साठी तब्बेतीचे कारण दिले आहे.
अरुण जेटली यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून लिहिलं आहे की मी आपल्याला औपचारिकरित्या विनंती करण्यासाठी लिहीत आहे की मला माझ्यासाठी, माझ्या उपचारांसाठी व स्वास्थ्यासाठी वेळ देण्याची संधी देण्यात यावी. यासाठी मला या नवीन सरकारमध्ये कोणतीही जबाबदारी देऊ नये.
पुढे त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलंय की, जेव्हा तुम्ही निवडणुकीचा प्रचार संपवून केदारनाथ ला जात होतात, तेव्हाच मी आपल्याला बोललो होतो की मला सर्व जबाबदारिंपासून मुक्त करा.
I have today written a letter to the Hon’ble Prime Minister, a copy of which I am releasing: pic.twitter.com/8GyVNDcpU7
— Arun Jaitley (@arunjaitley) May 29, 2019
असं मानलं जातं की मोदी सरकारसाठी जेटलींचा हा निर्णय धक्कादायक आहे. कारण NDA मधील काही जुन्या जाणत्या लोकांमध्ये अरुण जेटली यांचा क्रमांक अव्वल लागतो. अरुण जेटली यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातही मंत्रिमंडळात महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडला होत्या. त्यानंतर तब्बल १० वर्ष विरोधीपक्षात असतानाही त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनांत महत्वाच्या भूमिका वठवल्या आहेत.