“मुंबई ‘यांच्यासाठी’ राहण्यालायक राहिलेली नाही” – अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
मुंबई दि.३: राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्ये प्रकरणी चालू असलेल्या राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी एक ट्विट करत म्हटलंय की, “ज्या प्रकारे सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्येचे प्रकरण हाताळले गेलेय त्यावरून मुंबईने आपली मानवता गमावली असून हे शहर निष्पाप आणि आत्मसन्मानाने जगणाऱ्यांसाठी राहण्या लायक राहिलेलं नाही.”
The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled – I feel #Mumbai has lost humanity & is no more safe to live – for innocent, self respecting citizens #JusticeforSushantSingRajput #JusticeForDishaSalian
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 3, 2020
अमृता फडणवीस यांच्या या ट्विटवर मग कंमेंट्स चा पाऊसच पडला.
.@fadnavis_amruta जी स्वतःच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे तिकीट पोलीसांना वाटप करायला लावणाऱ्यांच्या तोंडी ही उपदेशाची भाषा शोभत नाही आणि जर तुम्हाला मुंबई इतकीच असुरक्षित वाटत आहे तर मग बोऱ्या-बिस्तारा गुंडाळून जा नागपूरला.
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) August 3, 2020