पहा : ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
नवी दिल्ली: भाजपनेही ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत आज, सोमवारी (दि.८) निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे संकल्प पत्र प्रसिद्ध करण्यात आले. त्यात ७५ संकल्पांचा समावेश केला आहे. २०२२ पर्यंत हे संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन त्यातून दिले आहे. निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजपाने जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या संकल्पपत्राचं प्रकाशन करण्यात आलं.
भाजपचा जाहीरनामा पुढील प्रमाणे:
१) दहशतवादाचा सामना करण्यासाठी सुरक्षा दलाचं सशक्तीकरण करणार
२) प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार
३) प्रत्येक घरात नळामार्फेत पाणी पोहोचवणार, नद्यांच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला जाईल
४) ५० शहरांत मेट्रोचं जाळं निर्माण करणार
५) कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी २५ लाख कोटींची गुंतवणूक करणार
६) ५ किलोमीटरच्या अंतरावर बँकिंग सुविधा देणार
७) देशातील सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधि योजनेचा लाभ
८) ६० वर्षांनंतर पेंशन योजना शेतक-यांच्या सामाजिक व सामाजिक सुरक्षेसाठी.
९) २०२५ पर्यंत ५ मिलियन दशलक्ष डॉलर्स आणि २०३२ पर्यंत १० ट्रिलियन दशलक्ष डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल
१०) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १ लाख कोटी रुपयांची क्रेडिट गॅरंटी योजना देण्यात येईल.