Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भारतीय तटरक्षक दलाने केरळच्या किनाऱ्याजवळून, सहा भारतीयांसह इराणची मासेमारी बोट घेतली ताब्यात

भारतीय तटरक्षक दलाने केरळच्या किनाऱ्याजवळून, सहा भारतीयांसह इराणची मासेमारी बोट घेतली ताब्यात

नवी दिल्‍ली, दि. ६: भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) ५ मे २०२४ रोजी केरळच्या किनाऱ्याजवळ, बेपोरच्या पश्चिमेला असलेल्या समुद्री भागातून सहा भारतीय कर्मचाऱ्यांसह एक इराणी मासेमारी बोट ताब्यात घेतली. आयसीजीच्या बोटी आणि विमाने यांच्या वेगवान समुद्री-हवाई समन्वयासह ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

इराणी बोटीला अडवल्यानंतर, आयसीजीच्या जवानांच्या तुकडीने बोटीवर प्रवेश केला आणि देशविरोधी कारवायांमधील सहभागाचा शोध घेण्याच्या दृष्टीने या बोटीची कसून तपासणी करण्यात आली. प्राथमिक चौकशीअंती असे दिसून आले की या बोटीचा मालक इराणी नागरिक असून त्याने तामिळनाडूमधील मासेमारांना कंत्राटी स्वरूपाच्या व्यवहारातून बोटीवर काम दिले आणि त्यांना इराण जवळील समुद्रात मासेमारी करण्यासाठी इराणी व्हिसा मिळवून दिले.

   

त्या बोटीवरील भारतीय कामगारांनी असा आरोप केला आहे की बोटीच्या मालकाने त्यांना वाईट वागणूक दिली आणि मुलभूत जीवनावश्यक बाबींपासून त्यांना वंचित ठेवले तसेच त्यांचे पासपोर्ट देखील आपल्या ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेली बोट अधिक तपासासाठी ६ मे २०२४ रोजी कोची येथे सुरक्षितपणे आणण्यात आली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *