Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा लाँग मार्च….

Indian Farmer 1

 

नाशिक: आपल्या सर्व मागण्या मान्य होऊनही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने किसान सभेने पुन्हा एकदा लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. २० फेब्रुवारी रोजी हा लाँग मार्च नाशिक येथून सुरु होणार असून ह्या लाँग मार्चमध्ये सहभागी होणारे शेतकरी नाशिक ते मुंबई हा १८० किलोमीटरचा प्रवास पायी चालून पूर्ण करणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी हा लाँग मार्च मुंबईत पोहचणार आहे.

गेल्या वर्षी किसान सभेने काढलेल्या लाँग मार्च मध्ये मोदी सरकाने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. पण त्यानंतर त्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच नाही असे किसान सभेने सांगितले. या भाजप सरकाने आम्हा शेतकऱ्यांची फसवणून केली आहे आणि त्याच निषेधार्त आम्ही पुन्हा एकदा लाँग मार्च काढत आहोत अशी माहिती किसान सभेचे आमदार जे. पी. गावित यांनी दिली.

सरकारच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या लाँग मार्च मध्ये पालघर, नाशिक तसेच मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी होणार आहेत, असेही गावित यांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *