Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वाशिम जिल्ह्यात २२०० हेक्टर जमीन सिंचित होणार

मंगरूळपीर तालुक्यातील बॅरेजेसना मान्यता

वाशीम/मुंबई, दि. ८: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील २ बॅरेजेसना मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा होणार असून २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा गावाजवळ अडाण नदीवर हा बॅरेज बांधण्यात येत असून यामुळे बोरव्हा, पोटी, पारवा आणि लखमापूर या ४ गावातील ९०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यासाठी १६२ कोटी ४३ लाख एवढा खर्च येणार आहे. याच तालुक्यातील घोटा शिवणी बॅरेज हा देखील अडाण नदीवरच बांधण्यात येत असून त्यामुळे जिल्ह्यातील घोटा, शिवणी, पोघात, उंबरडोह, गणेशपूर, बहाद्दरपूर या ६ गावातील १३९४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यासाठी २३४ कोटी १३ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. अशा रितीने अमरावती भागातील पाटबंधारे विकासाचा अनुशेष दूर होण्यास मदत होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *