‘वंदे मातरम्’ने ठाकरे सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात
नागपूर: विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने करण्यात आली. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य याप्रसंगी उपस्थित होते. शिवसेना ही गेल्या अनेक वर्षांपासून ‘वंदे मातरम’ बाबत आग्रही राहिली आहे. आणि हिच भूमिका सेनेला महाविकास आघाडीत कायम ठेवता आली याचं राजकीय विश्लेषकांना अप्रूप वाटतं. विशेष म्हणजे या आघाडीत समाजवादी पक्षाचे अबू आझमी हेही सदस्य आहेत. ज्यांचा कधीकाळी ‘वंदे मातरम’ म्हणण्यास विरोध होता.
उद्देशिकेचे वाचन
विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी कामकाजाच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. या सभागृहाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा. त्या दृष्टीने कामकाज झाले पाहिजे, असे आवाहन श्री.पटोले यांनी यावेळी केले.