दहशतवाद्यंसमोर झुकणारे ते पूर्वीचे सरकार आम्हाला नकोय – उद्धव ठाकरे
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेना युतीचा पहिला मेळावा आज अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
गेल्या १५-२० दिवसांपासून काय बोलावे ते कळत नव्हते. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवले आहे जे आवडेल, जे पटेल तेच बोलायचं. गेल्या २५ वर्षांपासून राज्यात युती होती काही कारणामुळे युती तुटली आज तीच पुन्हा एकदा एकत्र आली आहे ती फक्त संघर्षासाठी. हिंदुत्व आणि राष्ट्रासाठी हि युती झाली. आज जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना मी आधीपासून नरेंद्र भाई बोलतो, ते मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत.
आम्हाला आमच्यासाठी किंवा आमच्या कार्यकर्त्यांसाठी सत्ता नको, आम्हाला सत्ता हवी ती आमच्या गोर गरीब जनतेसाठी. शिवसेना-भाजप हे देशातील सर्व सामान्य माणसाची शेवटची आशा आहेत. दहशतवाद्यांसमोर झुकणारे ते पूर्वीचे सरकार आम्हाला नकोय असेही ते म्हणाले.
देशाला आधार देण्यासाठी अजून तरी कोणताच पक्ष सक्षम नाही. शिवसेनाप्रमुख आणि अटलजी यांच्या पिढीने रक्त आटवल्याने आजपर्यंत हिंदुत्त्व टिकून आहे. बाळासाहेब आणि अटलजीनी जो संघर्ष आपल्यासाठी केला आहे तो आता विसरून चालणार नाही. देशाच भलं करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले नसते तर आपल्या डोक्यावर कोण बसलं असतं हे तुम्हाला माहिती आहे असे बोलत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
आजकाल कोणावर टीका करायची म्हणजे भीती वाटते. उद्या तो भाजपा नाहीतर शिवसेनेत असायचा असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता शरद पवारांना भाजपात घेऊ नका. नाही तर निवडणुकीत गंमत येत नाही. थोडी तरी लोक समोर ठेवा. सगळेच आपल्या पक्षात आले तर बोलायचं कोणावर असं उद्धव ठाकरे यांनी म्हणताच उपस्थितांत हशा पिकला. सध्यातरी शिवसेना-भाजप युतीने प्रचाराचा श्रीगणेशा केल्याचे दिसते आहे. पण अद्याप त्यांनी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही.